पुरुषोत्तम लक्ष्मण [पु. ल.] देशपांडे हे लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक होते. त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे म्हटले जायचे. त्यांच्या आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात ते प्रेमाने पु. ल. म्हणून ओळखले जातात. लेखक आणि कवी वामन मंगेश दुभाषी ऊर्फ ऋग्वेदी हे पु.ल.देशपांड्यांचे आजोबा होते तर आणि सतीश दुभाषी हे मामेभाऊ आहेत.
P. L. Deshpande was one of the legends in marathi literature. Probably the most read, most quoted and most loved author of maharashtra
The writings though mostly known for its sublime comic nature,include a vast range of plays,caricatures,essays, travelogues and much more
खूपदा विचार होऊन पुढे तो मांडता येतोच अस नाही. कधी मांडायच खूप असत पण प्रगल्भ vocabulary नसते, कधी नुसतच सुन्न वाटत, कधी सोयिस्कररित्या दुर्लक्ष करतो आपण. ultimately जाऊ दे होतं त्या सगळ्याचच. पण मग एक वेळ अशी येते की आपण कोणालातरी भेटतो आणि सगळ confess करायचा प्रयत्न करतो, अगदी सगळ. तोड़क मोडकं जस जमेल तस. एक शून्य मी वाचताना मीच पुलंच्यासमोर confess karat hote. मला जे म्हणायचय ते मी त्यांच्याशी बोलत होते, मला शब्दात मांडता येत नव्हतं ते पुलं सांगत होते आणि दरवेळी मी म्हणत होते "haa exactly मला हेच म्हणायचय"
पु. ल देशपांडे यांनी लिहिलेल्या वैचारिक लेखांची कात्रणे सुनीताबाईंनी जपून ठेवली होती. पुलंच्या पश्चात मौज प्रकाशनाने त्यांना एकत्रित पुस्तक स्वरूपात वाचकांसमोर आणले. पुलंच्या पहिल्या स्मृती दिनाला ह्या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. जुन्या जाणत्या लोंकानी यातील काही लेख महाराष्ट्र टाइम्स, एकता, शतायुषी, नवभारत अशा मासिकांमध्ये किंवा नियतकालिकांमध्ये कदाचित याआधी वाचले असतील
मला ह्या पुस्तकाविषयी दोन एक वर्षांपूर्वी समजले. एक - दोन लेख थोड्याथोड्या विलंबाने वाचत अखेर एका वर्षात हे पुस्तक वाचून पूर्ण झाले. लेख वैचारिक आहेत, वाचताना आपण अंतर्मुख होतो, स्वतःला तपासून बघतो, अस्वस्थ होतो, सुन्न होतो, कधी एखादी तिडीक आपल्या डोक्यात जाते. त्यामुळे एका बैठकीत वाचण्यासारखे हे पुस्तक निश्चितच नाही (माझ्यासाठी तरी नव्हते). उलट संग्रही ठेवावे, कधी मधेच एखादा लेख परत वाचावा अशी पुस्तके कमीच - हे त्यापैकी एक वाटले.
आपल्याला त्यांच्या इतर साहित्यातून माहित असलेले पुलं हे रसिक, मिश्किल, हजरजबाबी. तल्लख आहेत. त्यांचा विनोद निखळ आनंद देतो, तर कधी कोपरखळ्या मारून जातो. त्यांनी रंगवलेली पात्रे इतक्या वर्षांनंतरही वाचकांच्या मनात जिवंत राहिली आहेत. स्वतः पुलंनी सांगून ठेवलंय की लोकांनी त्यांना आठवावे तेच मुळी - “ ह्या माणसाने आम्हाला हसवले“ असे . पण हे पुस्तक वाचताना जाणवतं, या सर्व नितळ, निखळ आणि सात्विक विनोदाचा पाया मजबूत, भक्कम विचारसरणीत होता. विचारांच्या खोलीत होता. अफाट वाचनात होता. नीरक्षिर विवेकात होता. कदाचित म्हणूनच त्यांचा विनोद इतका टिकला. जिवंत राहिला.
‘एक शून्य मी’ वाचताना मला ते विनोदाच्या अलीकडले, पलीकडले बुद्धीची धार सतत पाजळती ठेवणारे, जे जे उत्तम आणि उदात्त आहे त्याचा ध्यास बाळगणारे, वाचनाचा व्यासंग जपणारे, नाटकावर मनापासून प्रेम करणारे, माय मराठी विषयी ममत्व वाटणारे, सुस्पष्ट विचार सुसूत्रतेने सडेतोडपणे मांडणारे, याआधी मी कधी न बघितलेले पुलं भेटले.
इथे ते सरळ परखडपणे मुद्दे मांडतात, त्रुटी दाखवतात, प्रसंगी चपराक बसावी, तसे त्यांचे ते शब्द क्वचित कधी आपल्या वर्मी बसतात, अस्वथ करतात. ते स्वतः शून्य होत जाताना बघताना / वाचताना, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या - आपल्याला रिते करत नेणाऱ्या हजारो गोष्टी, आपल्या डोक्यात थैमान घालू लागतात. ते रितेपण आपल्याला सुन्न करते, अर्थात त्याची परिणीती काही ठोस भरीव कामाने झाली तर .. !
प्रसंगा प्रसंगाने लिहिलेले हे लेख अनेक विषयांवर, महान व्यक्तींवर बेतलेले आहेत. अत्र्यांना त्यांच्या व्यक्तिमत्वाप्रमाणेच मिळालेली अफाट लोकप्रियता, त्यांचा मोकळा-ढाकळा स्वभाव यांवर पुलंही भरभरून मुक्तहस्ताने लिहितात. महात्मा ज्योतिबा फुल्यांचा जयजयकार करणारे स्वतः त्याच जागी जेव्हा सत्यनारायणाची पूजा मांडतात त्याविषयी लिहिताना त्यांच्या लेखणीलाही धार चढते. भिंतीवर गांधीजींचा फोटो लावून त्यांची मूल्ये पायदळी तुडविणाऱ्यांचा उद्धार करायला ते मागे पुढे बघत नाहीत. गांधीजी, विनोबा भावे यांच्या विषयी तितक्याच आदराने लिहताना लेखणी नम्र होऊन जाते. मराठी माणूस ज्या तत्वांचा इतका अभिमान ( की दुराभिमान ?) बाळगतो, त्यातील बाळगणे आणि आचरणे यातील विसंगती, ‘मराठी दृष्टिकोनातून मराठी माणूस’ मध्ये थोड्या बोचऱ्या आणि रोखठोक मराठ��� बाण्यात सांगतात. ‘नाटक’ आणि ‘नाटकवेडा महाराष्ट्र’ मध्ये नाटककार पुलंनी महाराष्ट्राचे नाटक वेड दाखवून देताना, नाटक बघतो तेव्हा प्रेक्षकांची अनुभूती कशी असते. चांगले नाटक कसे असावे, ते कसे बघावे - असे त्यातील बारकावे समजावून सांगताना वाचकाला ���्रेक्षक म्हणून समृद्ध केले आहे. त्यातील शूरा मी वंदिले, नामस्मरणाचा रोग, संस्कार, एक शून्य मी असे काही लेख तर परत परत वाचुन समजून घ्यावे असे .
पुलंवर निस्सीम प्रेम करणाऱ्यानीं त्यांची ही फारशी (अलीकडच्या काळात ) प्रकाशझोतात न आलेली बाजू, त्यांच्या प्रतिभेचा हा पैलू जाणून घेण्यासाठी, ‘एक शून्य मी’ जरूर वाचावे.
This one is fantastic read. Thoughtful and highly intellectual insight of Pu LA can be felt right from page one. The chapters I liked the most are Gandhi, Time managment of Gandhi, Ladakh tour, How to behave when you are senior citizen, sanskar, Marathi manus etc.