Jareela (The Castrato), is set in a mountainous tribal region where Changdeo finds a teaching job. Soon after he begins to like the primitive life there, a sudden explosion occurs at the power station and the whole town sinks into darkness every day at the sunset. In the primordial dark, Changdeo discovers his own self.
Bhalchandra Vanaji Nemade (born 1938) is a Marathi writer from Maharashtra, India. He is famous for his books Hindu and Kosala. Also he is known for his novel Hindu jagnyachi samrudhha adgal. He is a recipient of the civilian honour of Padma Shri (2011) and the Jnanpith Award (2014).
A college professor's enthusiasm over moving to a new village and making a fresh start in life as a young man through his teaching job does not last long as he gets increasingly caught up in staffroom politics, experiences the loneliness of his bachelorhood, and faces the lifelessness of his environment. This story is about the frustration of losing personal agency while existing in a corrupted social setting.
Two reasons for my poor rating of this book: 1) The writing of this novel felt dead to me. Unlike the writer's previous works, the narration of this story felt uninspiring, uninventive, and saturated on the technical level. Even if this writing style was a deliberate choice to suit the mood of the story, the promise of delivering an impactful narration remained unfulfilled.
2) As a reader I find it disappointing when a story ends without showing any personal growth of the character. Even if the character had gained some perspective on his position in life, it would have been reassuring enough. With a character who is as self-aware as the one in this novel, the possibilities of emotional development were plentiful, but unfortunately they were all missed out on.
#जरीला : #भालचंद्र_नेमाडे जरीला म्हणजे चांगदेव चातुष्टय मधील मधील तिसरा भाग. चांगदेवला मुंबई नोकरीसाठी सोडतो (#बिढार) तर दुसरं गाव तिथल्या वातावरणाला कंटाळून सोडतो (#हूल). परंतु #जरीला मधलं गाव सगळं ठीक ठाक असून ही सोडतो. या भागात चांगदेवच्या वागण्यात, त्याच्या जाणिवा-नेणिवा यातील होणारे स्थित्यंतरं चितारतली आहेत. इतर तरुणांप्रमाणं चांगदेवही स्वतःच्या विश्वात गुरफटलेला असतो, मग भलेही ते आभासी का असेना. तो नेहमीच मस्तीत जगतो, फारशी भविष्याची चिंता न करता. वरून निष्काळजी वाटणारा चांगदेव फार संवेदनशील असतो, अगदी घरातील कोष्ठ्यच जाळंही तो काढत नाही, त्याच्याबरोबर स्वतःची तुलना करतो बसतो. शेवटी ती खोली सोडताना त्याच्यासाठी तो खिडकी उघडी ठेवतो. एकटेपणा दूर करण्यासाठी तो बरीच धडपड करतो, सुरवातीला साऱ्याच्या गराड्यात तो राहत असतो, तर नंतर, एका डॉक्टर बाईशी गप्पा मारायला लागतो, तर कधी गावाबाहेरच्या वयस्करांसोबत गप्पा मारायला जातो. चांगदेव स्वतःहून त्याच्या काकाच्या घरी जातो अन त्याचे लग्नाबद्धलचे विचार बदलतात. संसारी माणूस प्रत्येक गोष्टीत आनंद मानायला शिकलेला असतो हे त्याला समजतं. खरं तर त्याने लग्नाचा कधी विचारच केलेला नसतो पण इतरांचे बघून अन सतत येणाऱ्या पारूच्या आठवणीमुळे अस्वस्थ होऊन लग्नासाठी उतावीळ होतो आणि तोही लग्नाचा खटाटोप करू लागतो. पण येथेही निराशाच हाती लागते. यावेळी मानवी व्यवहार त्याला त्याच स्वरूप दाखवून देतात आणि त्याची त्यालाच किव येते. कित्येक वर्षांनी तो त्याच्या गावी जातो, त्याच्या आई-वडिलांची झालेली दारुण परीस्थिती त्याचं मन पोखरायला पुरेशी असते. पण इथूनही तो त्यांना काही मदत वगैरे करण्याच्या भानगडीत न पडता नेहमीप्रमाणे पलायन करतो. आपण कधीच पैशाच्या बाबतीत कधी गंभीर विचार का केला नाही हा प्रश्नही त्याला यावेळी पडतो. त्याचे पूर्वज गावचे पाटील-वतनदार असलेले. पण आता मात्र त्याचे फक्त अवशेष उरलेले आहेत. आपली तर दमडीचीही मदत नाही याचीही त्याला खंत वाटते. आयुष्यात काय मिळवलं किंवा काय गोळाबेरीज केली ह्याचं उत्तर त्याच्याकडे नसतं. केवळ निरर्थकपणे ध्येयशून्यतेने जगत असलेले बेफिकरी आयुष्य एवढाच काय तो प्रकार असतो. एव्हाना सहज पैसे उडवणारा किंवा पैशांची पर्वा न करणारा चांगदेव निष्ठुर अन व्यवहारिकपणे जुने स्नेही पवार यांच्याकडे राहिलेले पैसे मागतो.
चांगदेव चतुष्टय बद्दल एकंदरीत लिहावं तितकं थोडं आहे. नेमाडेंच्या स्वानुभवाधारीत आत्मकथानात्मक कादंबऱ्यांची ही मालिका अविवाहित मध्यमवर्गीय विचारी तरूणांना बऱ्याचवेळा आपलीच कथा वाटेल. त्यातही जरीला मध्ये समाजाशी जुळवून घेण्याच्या धडपडीअंती पराभूत झालेला नायक नेहमीच मनात घर करून राहतो. शोकात्म लिखाणात क्वचित आढळणारे भाषासौष्ठव या मालिकेत विपुल प्रमाणात आहेत. नायकाची आत्मचिंतने तर उद्धृत करण्याजोग्या अवतरणांची खाणच आहेत.
'हूल' मधलं गाव सोडून चांगदेव आता नवीन गावी आलाय. यामध्ये परत नेमाडे विविध पत्रांच्या माध्यमातून अनेक गोष्टी सांगतात उदाहरणार्थ चौधरी या वनखात्यातील अधिकारी मित्राच्या माध्यमातून जंगल, आदिवासी विकास यावर चर्चा. कॉलेजतलं बहुपदरी राजकारण इथे सुद्धा आहे. विद्यार्थी आणि गाव पूर्वीपेक्षा बरेच चांगले आहेत. सुरुवातीला बऱ्याच गोष्टी चांगदेवच्या मनासारख्या होतात उदा. चांगले सुसंस्कृत विद्यार्थी, प्रशस्त खोली, गावसुद्धा चांगलं आहे. गावातलं साधं परंतु जातीय, धार्मिक पदर असलेल्या जीवनाचं वर्णन इथे येतं. खोलीवरच्या बैठकी, मैफिली, गप्पा, बुद्धिबळ, खानपीनं. 1965 भारत-पाकिस्तान युद्धाच्या बहाण्याने हिंदू-मुसलमान, आर्य-द्रविड, संस्कृत-उर्दू यावर चर्चा येते. चांगदेवला आता एकटेपणाचा कंटाळा आलाय. त्यामुळे तो लग्नाविषयी गंभीर विचार करतोय. साखर कारखान्यात काम करणाऱ्या काकाचा बेताचाच पण सुखी संसार पाहून त्याची लग्न करण्याची इच्छा प्रबळ होते. आता तो लग्नाकडे बरंच पारंपरिक आणि व्यवहारी दृष्टीने बघतोय. प्रेम जमत नाही म्हटल्यावर तो मुलगी पाहण्याचा एक कार्यक्रम सुद्धा करतो. परंतु शेवटी काही घटणांमुळे चांगदेवला हे गाव सुद्धा सोडावंसं वाटतं. तोच तोच पणा टाळून बदल हवासा वाटतो. आणि परत नव्या गावाचा शोध सुरु होतो.