माणसाला दोन मन असतात. एक पशूच आणि एक देवाचं. पाहिलं उपभोगत रमून जात,दुसर त्यागात आनंद मानत ! पहिल्याला शरीराच्या सुखपलीकड काहीच दिसत नाही. दुसऱ्याला सुखपलीकडे असणाऱ्या उदात्ततेचा साक्षात्कार होतो. या दोन मनांतल्या पहिल्याला निसर्गान आपला सार सामर्थ्य दिल आहे. दुसर त्या मानाने फार दुबळ असत. या दुसऱ्या मनाच बळ वाढवण, दोनी मनाच बळ सारख करून जीवन सुखानं जगण आणि जगता जगता त्याचा विकास करणं, हे यशस्वी आयुष्याचं खरं लक्षण आहे. पण मनुष्याचा आयुष्यात या दोन मनाचा झगडा नेहमीच सुरु असतो. या झगडयात ज्याच दुसरा मन विजयी होत, ते कुठल्याही संकटाला हसत तोंड देतात. पण पहिल्या मनाच्या आहारी गेलेला माणूस दुबळा होतो, मोहांना बळी पडतो जिवलग माणसांचीही प्रतारणा करू लागतो, आणि ......... !
ययाती नंतर मी वाचलेली वि. स. खांडेकरांची हि दुसरीच कादंबरी, अगदी मनाला स्पर्शुन जाणारी. महारवाड्यातल्या एका हुशार तरुणाची हि कथा... अगदी अलगद उलगडत जाणारं त्याच्या आयुष्यातलं सत्य..... नक्की वाचा :)