G.N. Dandekar, (Devnagari: गो.नी. दांडेकर ) popoularly known as "Go.ni da" in marathi literature is one of the prominent writer of historical fictions & some real good biographical novels, Most of his books are also good travelogues including trekking data detailing almost minute information about the place & history associated with it.
He was honoured with a D.Litt degree by university of Pune.
गोनीदांच्या मानसकन्येची, ‘मनी’ची ही आगळीवेगळी कथा, एक सुंदर कलाकृती म्हणजे ‘रानभुली’.”
या कथेत गोनीदांनी एका धनगर समाजातील रायगडावर आणि तिथल्या प्रत्येक कडेकपारीवर अतोनात प्रेम करणार्या भोळ्या-भाबड्या परंतू अतिशय धीट पर्वत कन्येची, मनीची ही कथा... गडाशी असणारं तिचं सुंदर नातं आणि त्या नात्यामध्ये अडसर होवू पाहणारं आजुबाजुचं जग यांतली कूतरओढ फार जीवघेणी आहे.
हि मनी म्हणजे गडावरची खडानखडा माहित असलेली एक पोर, कधीही रात्री अपरात्री गडावर कुठेही हि बागडत असायची आणि धीट तर इतकी कि काळ्याकुट्ट मिट्ट अंधारात गाईची साथ देणारी चिमुरडी, अन वाघराच्या तोंडी गेलेल्या वासराचे पाय ओढणारी शूर वीरांगना ...
जेव्हा आप्पांनी तिला विचारलं कि तुला गडावर भीती नाही का वाटत तू अशी कधीहि कुठेही बागडत असतेस तर मणी यावर उत्तरली कि कशाची भीती बाळगू माझ्यासोबत तर राजांचा 'गडपुरुष' असतो, तो समर्थ आहे माझी राखण करायला.
पण हिच मणी जेव्हा मुंबई शहरात, एका बकाल झोपडीत नवऱ्यासोबत अतिशय तोकड्या जागेत राहू लागते तेव्हा अगोदरची धीट मणी भित्री भागुबाई झालेली असते.
गडावर, गुराढोरांवर जीवापाड प्रेम करणारी मनी लग्न करून नवऱ्याच्या घरी नांदायला गेली पण गडाच्या ओढीनं २-३ वेळा माघारी आली. मनी होती एक धनगराची पोर, गुरं राखणारी, रायगडाच्या कितीतरी अवघड वाटा एकटीनं चढउतरणारी. लाडक्या वासराला सोडवण्यासाठी वाघाशी झुंज देणाऱ्या मनीला भीती म्हणजे काय माहितीच नाही. जखमी गायीला वर नेण्यासाठी मदत येईपर्यंत अंधाऱ्या रात्री ती एकटी साथ करत बसली. गडावरचा प्रत्येक दगड, प्रत्येक गवताचं पातं तिच्या ओळखीचं. नवऱ्याला मुंबईला नोकरी मिळाली म्हणून रहायला गेली पण तिथल्या झोपडपट्टीची, गर्दीची, तिथे दिसणाऱ्या माणसाच्या विकृतीची तिला घृणा वाटली. तिथे रहायची अजिबात इच्छा नसलेली मनी चालत गडाकडे निघाली तर? मुंबईत चालणारे धंदे आणि तिथल्या बिभत्स वास्तवाशी तिची गाठ पडली तर काय?
अश्या या डोंगरकन्येची गोष्ट लिहावी ती गोनीदांच्याच लेखणीनं.
The main character in this story loves the fortress, where she was born and raised, so much that she can't live anywhere else, even after her marriage and going to her husband's small house in Mumbai. The sequence of events at the end is contrived.