Jump to ratings and reviews
Rate this book

जागर

Rate this book
जागर
१. बुद्धीजीवी वर्गातील वैफल्य
२.राष्ट्रीय एकात्मता आणि इतिहासाचा अभ्यासक्रम
३.समाजवादी शक्तीची पीछेहाट
४.मार्क्सवाद: तत्व व व्यवहार
५.विकेंद्र्करण: एक दृष्टीकोण
६ महात्मा गांधी : काही चिंतन
७. शांतीदूत नेहरू
८. सेक्युलारिझम आणि इस्लाम
९. धर्मग्रंथ : अनुयायी जीवन
१० राजकीय शोध व बोध

263 pages, Unknown Binding

30 people are currently reading
459 people want to read

About the author

Narhar Kurundkar

35 books50 followers
Narhar Kurundkar (Marathi: नरहर कुरुंदकर) was a well-known thinker and critic in Maharashtra. Through his books in Marathi and through various lectures related to such varying disciplines as history, politics, dramaturgy, literary criticism, aesthetics, fine arts, he contributed to the cause of education and culture in Maharashtra. He offered original and unbiased incisive analysis of manifold challenges and complexities of contemporary social, political and cultural environment.

During his life time with lectures, writings and encouragement to young writers and poets Prof. Kurundkar instilled confidence within people of Marathwada. He provided thought leadership to various social and cultural activities. School of Art, schools of music, research center for history, Marathwada Vikas Andolan are some of the examples. Prof. Kurundkar had become synonym for the Socio-cultural movement of Marathawada. His untimely death had created a void in socio-cultural arena.

प्रा. कुरुंदकरांच्या लिखाणाची औपचारिक सुरवात १९५३ साली प्रतिष्ठान या मराठवाडा साहित्य परिषदेच्या मुखपत्रात समीक्षणात्मक लेख प्रसिद्ध होऊन झाली. त्यावेळी ते केवळ २१ वर्षाचे होते. त्यानंतर मराठवाडा दिवाळी अंकात शरदचंद्र चटर्जी यांच्या शेषप्रश्न या पुस्तकावर त्यांनी एक लेख लिहिला. पुढे नवभारत, सत्यकथा अशा प्रस्थापित मासिकांमध्ये विविध विषयावर लेख प्रकशित होऊ लागले.
रिचर्डसची कला मीमांसा हे पहिले पुस्तक १९६२ साली प्रकाशित झाले. देशमुख आणि कंपनी च्या रा. ज. देशमुख यांच्या आग्रहाखातर प्रा. कुरुंदकर यांनी एक २०० पानांचा समीक्षणात्मक लेखसंग्रह करून द्यायचे कबुल केले. तो पुढे रूपवेध या नावाने प्रसिद्ध झाला. या नंतरही प्रा. कुरुंदकर यांचे अनेक लेखसंग्रह प्रकाशित झाले. लेखसंग्रहाबद्दल एका पत्रात प्रा. कुरुंदकर लिहितात,
"लेख सुटे सुटे प्रकाशित होतात. त्या त्या वेळी पार्श्वभूमीसह संपूर्ण विषय मांडावा लागतो. अशा वेळी संग्रह केला की ग्रंथभर पुनरुक्ती होत राहते".
ही पुनरुक्ती टाळणे हे लेखकाचे कर्तव्य आहे असे ते मानत. मधल्या काळात झालेल्या अभ्यासाने मतांमध्ये ही बदल होतो.
"जे माझे मत चूक आहे, हे मला पटले व मी त्या मताचा त्याग केला", अशी त्यागलेली मते/ विचार लेख संग्रहात प्रकाशित करण्याची प्रा. कुरुंदकर यांची तयारी नव्हती. ग्रंथ रूपाने लेख संग्रह प्रकाशित करताना ते मोठ्या प्रमाणात फेर लिखाण करून, जेथे शक्य असेल तेथे पुनरुक्ती टाळून, चुका सुधारून घेत असत. आपल्या पुस्तकाबद्दल एका पत्रात ते लिहितात,
" माझ्या विवेचनाचे महत्व कदाचित कुणाला वाटणार नाही. माझी स्तुती होईल, विवेचनाची उपेक्षा होईल, मग माझ्या विवेचनाचे महत्व समजणारे वाचक निर्माण होईतो थांबणे भाग आहे."
ते पुढे लिहितात,
"पण, माझी इच्छा कठोर टीका होऊन सर्वांनी मला मुर्खात काढावे ही आहे. कारण त्यासाठी माझ्यापेक्षा खोलात उतरावे लागून मराठी समीक्षा अधिक सखोल करावी लागेल व तेच मला हवे आहे."

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
60 (65%)
4 stars
20 (21%)
3 stars
6 (6%)
2 stars
4 (4%)
1 star
1 (1%)
Displaying 1 - 3 of 3 reviews
175 reviews4 followers
July 12, 2025
तर्कशुद्ध विचार कसा करावा याचा वस्तुपाठ म्हणजे नरहर कुरुंदकर यांचे लेखन !

मी वाचलेले कुरुंदकरांचे हे पहिले पुस्तक. त्यांच्याविषयी अनेकदा वृत्तपत्रांतून अथवा इतर मराठी वाचकांच्या कौतुकातून ऐकलेलं होतं पण मी स्वतः त्यांचं पुस्तक वाचलेलं नव्हतं. जागर वाचून पूर्ण झाल्यावर वाटलं की आपण फारच उशीर केला. जरी श्रीमान योगी मी शाळेत वाचलेलं असलं तरी त्यावेळी एखाद्या पुस्तकाची प्रस्तावना वाचणे देखील महत्वाचं असतं किंवा चुकून प्रस्तावना वाचलीच तर एवढ्या अधिकारवाणीने प्रभावी प्रस्तावना लिहिणारे हे लेखक कोण बरे याचा शोध घ्यायचा असतो एवढी समज नव्हती. असो.

जागर वाचताना पहिली गोष्ट जाणवली म्हणजे कुरुंदकरांचा कार्यकाळ मागील शतकात होऊन गेला हे एकप्रकारे बरेच झाले. कारण ऐतिहासिक घटना अथवा व्यक्तींविषयी तर्कशुद्ध कसोटी लावता येते आणि त्याची सार्वजनिक चर्चा करता येते हे चित्र दुर्मिळ होत चालले आहे. याविषयी पुस्तकातील पुढील दोन परिच्छेद उल्लेखनीय आहेत.

“ जनतेला सत्य समजू न देण्याचा परिणाम नेहमी वैफल्यातच होत असतो. लोकशाहीत कठोर सत्याची सार्वजनिक चर्चा होणे अत्यंत आवश्यक असते. कारण ह्या चर्चा अल्पकाळात कटुता निर्माण करणाऱ्या जरी दिसल्या, तरी दीर्घ काळात याच चर्चा विचार करणाऱ्या वर्गाच्या मनाची जडणघडण बदलून टाकीत असतात. ”

“ अनिष्टांचा त्याग करून इष्टाचा भ्रामक गौरव करणे हा इतिहासाचा उपयोग नसतो. तो इतिहासाचा दुरुपयोग असतो. हलक्या, भाबड्या , स्वप्नाळू श्रद्धा सत्याच्या कठोर अग्नीत परिशुद्ध करून घेणे व अपरिहार्य वास्तवाची जाणीव करून देणे हे इतिहासाचे काम असते. तोच इतिहासाचा उपयोग असतो. या दृष्टीने पाहताना क्रमिक इतिहासात घटनांच्या जंत्रीपेक्षा प्रवाहांची मीमांसा महत्त्वाची ठरली पाहिजे. “

महात्मा गांधींच्या राष्ट्रनिर्मितीच्या कार्याविषयी कुरुंदकर एका वेगळ्या पद्धतीने प्रकाश टाकताना लिहितात :

“ माणूस हा मोठा चमत्कारिक प्राणी आहे. तो भुकेच्यापोटी कोणते पाप करणार नाही ? सगळीच पापे करील, हे खरे आहे. पण समोर सुग्रास अन्न वाढून ठेवलेले असतानासुद्धा एकदा हा माणूस हट्टाला पेटला, की भुकेच्या बजनाखाली सारे शरीर क्षीण होत जात शेवटी मरणही पत्करले जाते, पण अन्नाचा स्वीकार केला जात नाही. मानवी जीवनात मूल्यांच्या निष्ठा प्रकृतीवर मात करण्याइतक्या प्रबल असू शकतात. ही काहींच्या ठिकाणी असणारी मूल्यांची प्रबलता सर्वसामान्य मानवी जीवनाचा सार्वत्रिक भाग केल्याशिवाय केवळ पशुत्वाशी तडजोडी करून प्रेरणांच्या दयेवर संस्कृती सुरक्षित होऊ शकत नाही.

गांधींचे सारे तत्त्वज्ञान एक छोट्या सूत्रातून येते. ते सूत्र म्हणजे लढण्यासाठी तलवार आवश्यक असते, पण पुरेशी नसते. तलवारीखेरीज लढण्याची जिद्द असणारे मनही हवे असते. हीच गोष्ट घरालाही लागू आहे. निवाऱ्यासाठी छप्पर आवश्यक असते, पण पुरेसे नसते. छपराखाली राहण्याची इच्छाही आवश्यक असते. राष्ट्र स्वतंत्र होण्यासाठी व स्वातंत्र्य अबाधित ठरण्यासाठी संघटना आवश्यकच असते. पण ती पुरेशी नसते. त्यासाठी स्वातंत्र्येच्छ मन असावे लागते, आणि या मनात प्रसंगी मूल्यांसाठी बलिदान देण्याची शक्ती असावी लागते. गांधीवादाचे अर्थकारण वादग्रस्त असू शकते. माणुसकीचा कणा शिल्लक कसा ठेवावा, याचे गांधीवादाने दिलेले उत्तर विवाद्य ठरण्याची वेळ अजून आलेली नाही. आज विज्ञान शस्त्राच्या जोरावर सर्व मानवजात नष्ट करू शकेल इतके बलवान झाले आहे, ही भीतीची खरी बाब नाही. खरी चिंतेची व भीतीची बाब माणूस निर्माण करण्याचे विज्ञानाचे सामर्थ्य वाढत आहे, ही आहे.”


सहिष्णुतेचा खरा गाभा काय याविषयी फार मार्मिक टिप्पणी या लेखात आहे :

“ तुमचा आमचा संबंधच काय, तुम्हांला जे वाटेल ते तुम्ही करा, आम्हांला वाटेल ते आम्ही करू, तुमच्या गल्लीत तुम्ही राहा, आमच्या गल्लीत आम्ही राहू, ही सहिष्णुतेची फारच ओबडधोबड व्याख्या झाली. सहिष्णुतेचा अर्थ परिपूर्ण होण्यासाठी एका श्रद्धेची गरज असते. ती श्रद्धा म्हणजे माझ्या विचारातील काही भाग चुकीचा असू शकेल, तो मी दुरुस्त करण्यास तयार आहे. - या भूमिकेला सहिष्णुता असे म्हणतात. सहिष्णुतेचा गाभा म्हणजे नको असणारे सहन करणे हा नसतो. सहिष्णुतेचा गाभा न पटणाऱ्या भूमिकेला सहानुभूतीने समजून घेण्याची तयारी हा असतो.”


सत्याग्रहाचा पुढील लोकशाहीच्या यशस्वी प्रयोगामध्ये असणारा वाटा देखील स्पष्ट करण्यात आला आहे :

“ सत्याग्रह एकीकडे राजकीय लढ्यात लक्षावधींना सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देत होता. तशी संधी सशस्त्र चळवळ उपलब्ध करून देऊ शकत नव्हती. दुसरीकडे सत्याग्रह जनतेचा आत्मविश्वास जागा करीत होता. द्वेषाने पेटलेल्या मनाने अंधारात पोलीसठाणे जाळले तरी जाहीररीत्या सरकारची प्रतिष्ठा तशीच शिल्लक राहते. कारण पोलीसचौकी जाळणारे लोक उघड्यावर येऊन आपला हक्क व समर्थन घोषित करू शकत नाहीत. गांधीजींनी जनतेला जाहीररीत्या इंग्रजांचे कायदे मोडण्याची शिकवण दिली. मोकळेपणाने एकेक कार्यकर्ता कोर्टात सांगत असे की, हा कायदा मी तोडलेला आहे, पुन्हा संधी मिळाली तर तो मी तोडीन. मात्र सत्याग्रहाची चळवळ ही जितकी कायदा तोडण्याची चळवळ होती, तितकीच कायदा पाळण्याची चळवळ होती. सत्याग्रही तुरुंगाचे कायदे पाळीत. जेलमधून पळून जात नसत. ते पोलिसांशी झटापट करीत नसत. लाठीमारासमोर शांतपणे उभे राहत असत. मालमत्तेचा विध्वंस न करता ते कायदेही तोडू शकत असत, यातनाही भोगू शकत असत. अन्याय्य कायदा जाहीररीत्या निर्भयपणे तोडावा, कायदा तोडल्याबद्दलचे शासन शांतपणे बिनतक्रार सहन करावे, ही शिस्त गांधीजींनी लोकांना लावली. यामुळे निर्भयपणे इंग्रजांना 'देशातून चालते व्हा' म्हणून सांगण्याची मानसिक हिंमत जनतेत आली. लढ्यातून हुल्लडशाही, झुंडशाही, विध्वंस यांची लाट निर्माण झाली नाही. स्वातंत्र्यलढ्याची प्रक्रिया या मार्गाने गेली, म्हणून स्वातंत्र्योत्तर काळात लोकशाहीचा प्रयोग शक्य झाला.”


एकंदरीत वेळ काढून शांतपणे वाचावे असे आणि तुम्हाला विचार करायला भाग पाडणारे पुस्तक !
Profile Image for Rushikesh.
5 reviews1 follower
September 30, 2013
Simply amazing book. The way kurundkar explains his point of view is not only intesting but many a times eye opening. A Must read for everyone who is interested in socio-political analysis in Indian political history
Profile Image for Mihir Kulkarni.
7 reviews45 followers
September 29, 2013
पुन्हा पुन्हा वाचावे असे पुस्तक!
Displaying 1 - 3 of 3 reviews

Can't find what you're looking for?

Get help and learn more about the design.