प्रेम ही माणसाच्या जीवनातील एक मुख्य भावना आहे.प्रेम म्हणजे एखाद्या व्यक्तीविषयी आपल्या मनात निर्माण झालेली ओढ,आपुलकी,काळजी,आकर्षण आणि बरंच काही. खरं तर प्रेम हे अनेक प्रकारच असतं व ते अनेक प्रकारे व्यक्त करता येतं,त्याला मर्यादा नाहीत.पण या पुस्तकात आपण बोलणार आहोत ते ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना आपण अनुभवतो त्या प्रेमाबद्दल! प्रत्येक व्यक्ती ही जीवनाच्या या सोनेरी टप्प्यामधून गेलेली असते व आलेले अनुभव हे हृदयाच्या मखमली कप्प्यामध्ये साठवून ठेवलेली असते. प्रेमात सर्वांनाच यश मिळतं असं नाही.काहींना यश मिळतं तर काहींना अपयश मिळतं.काहींच्या अंगावर प्रेमाचा पाऊस पडतो तर काहींच्या अंगावर विरहाचं कडक ऊन पडतं.म्हणूनच या काव्यसंग्रहाला ‘प्रेमाचे उन्हाळे-पì