She was a novelist, short story writer, and poet from Maharashtra, India. She wrote in Marathi and English.
She was born in Pune in 1942 to Irawati Karve and Dinkar Karve, her father being one of the sons of Dhondo Keshav Karve. After finishing her high school education at Ahilyadevi School in Pune, she attended Fergusson College, also in Pune, to receive an M.A. in English Literature. She then received her PhD in English from Pune University.
'दुस्तर हा घाट' आणि 'थांग' या दोन्ही लघुकथा पुढे काय ची उत्कंठा वाढवत असतानाच प्रत्येक व्यक्तिरेखा कथेला आकार देत मनाला भिडत जातात. कथेतील प्रत्येक पात्रांना ग्रहणाची काजळी लागली असली तरीही वाचकाला नमूच्या साधेपणाची नीरभ्रता, दिमित्रीच्या डोळ्यात उतरलेली अलभ्य संध्या, तापलेल्या उन्हात पोळावे अशी अनुभवास आलेली कालिंदी, कोजागिरीच्या शीतल चांदण्यापरी भासणारे भाई अशा विविध पात्रांच्या छटा मनाच्या खोल डोहात उतरतात.
एखादी शोकांतिका वाचावी आणि मग उरातली सगळी बेचैनी, सगळ्या जुन्या आठवणी उसळी मारून वर याव्यात, असच काहीसं माझं झालं. मी फार गुंतून जाते गौरी देशपांडेच्या सगळ्याच व्यक्तिरेखांमध्ये आणि नमू, भाई, वनमाळी, Alistair ही देखील याला अपवाद नव्हती. खरंतर, आता त्यांची जवळजवळ सगळीच पुस्तकं मी वाचली आहेत पण तरीही प्रत्येक नवीन कथेत फार मोठं आयुष्याचं गमक मला आढळतं. खूप भावनाविवश करतात हि सगळीच माणसं! आणि हि सगळी मंडळी जरी त्यांच्या गुणदोषांसकट आपण स्विकारलीत ना, तरी मग त्यांच्या सर्व वागण्यावर आपल्याला कधी राग, तर कधी अपार प्रेम करावसं वाटतं. कधी हतबल देखील होतो आपण, नी कधी सगळचं त्यांच्यावर सोपवून आपण अगदी मुक्त पक्षी होतो.
एका स्त्रीची घुसमट, तिचं एकटेपण, तिच्या भावविश्वाचा इतका सुंदर उलगडा खचितच कुणी केला असेल. त्या तिच्या, कधी आनंदी तर कधी अतीव दुःखी अशा प्रवासाचा मागोवा आज तीस-चाळीस वर्षांनंतर देखील, एवढा प्रकर्षाने आपल्या मनाला भिडावा हे चांगलं कि आजच्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये काहीच कसा बदल झाला नाही म्हणून वाईट वाटावं? फार, फार, जटील प्रश्न मनाला पोखरून काढतील आणि त्यांची उत्तरं आपण शोधत राहू, असंच जीव मुठीत घेऊन जगताना!
कॉलेज ला असताना काही जुनी मासिक मिळाली...... एक नाव वाचाल गौरी देशपांडे म्हणाल वाचून बघू बया काय म्हणते..... जस जस वाचून संपत आलं तस तसं मला वेड लागायला आणि मी गौरी सारखंच जगायचं प्रयत्न करू लागले..... जगले सुद्धा....नंतर लग्न झालं आणि वाटलं आता गौरीची गरज नाही नवऱ्या बरोबर खुश राहायचं आणि सुखी संसार करायचा...... पण खरंच वेडी होते मी.... शरीरातून आत्मा वेगळा करता विसरले होते मी......
This entire review has been hidden because of spoilers.