आत्तापर्यंत वाचलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तकात एक तर ते देवाच्या रूपात दिसले किंवा एका माणसाच्या, डॉक्टर सामंत यांनी महाराजांची विविध रूपे दाखवली आहेत, धोरणी, राजकारणी, योद्धा, रणनितिकार, शासक, दूरदर्शी प्रशासक अशी नानाविध रुप दाखवली आहेत. महाराजांच्या कृती मागचे विचार, कार्यकारण भाव एवढ्या प्रकर्षाने राजा शिवछत्रपती किंवा श्रीमंत योगी ह्यात आलेले नाहीत. बहुतेक सगळ्या युद्धाचे आणि तहांचे विश्लेषण फारच अप्रतिम रीतीने केलेले आहे.
फक्त एकच गोष्ट जी मला खटकली ती अशी की पेशवाई आणि पेशव्यांवर केलेली टीका अस्थायी वाटते, ती टीका जर पार्श्वभूमी, तत्कालीन परिस्थितीत आणि विश्लेषणा सहित येती तर जास्त संयुक्तिक ठरती. महाराजांचा मोठेपणा अधोरेखित करण्यासाठी पेशव्यांना कमी लेखणे गरजेचे होतेच असे नाही, महाराजांचे वंशज त्यांच्याच योग्यतेचे असते तर पेशवे उदयास येते ना. असो पण त्याने ह्या पुस्तकाचे महत्व कमी होत नाही.
शिवरायांच्या लढायांचा विस्तृत इतिहास या पुस्तकामध्ये दिलेला आहे. या लढायांचे वर्णन करताना लेखकाने भूगोल आणि नकाशे यांचा सुंदर वापर केला आहे. शिवरायांची रणनीती सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी 5⭐️ च देणार परंतु शिवरायांच्या लढायांव्यतिरिक्त राजकीय चरित्रामध्ये लिहिलेल्या काही त्रुटींसाठी उणे 1⭐️...