जीवन ही या विश्वातली किती सुंदर घटना आहे। हा या विश्वाच्या समग्र अस्तित्वाचा किती पवित्र आणि मंगत घटक आहे। या जीवनाला आधार देणार आपल्या शरीराचं एक इवतंसं घरट हे आनंदाचं केवढं प्रसन्न अधिष्ठान आहे! या घरट्याचा भाग असलेलं निर्मळ मन आणि विवेकी बुद्धी हे सजीवाचं आणि खास करून माणसाचं केवढं मोठं वैभव आहे। हे सुंदर जीवन आपण निरामय आनंदानं ओतप्रोत भरून टाकावं, या आनंदाचे सारे पैलू अनुभवावे, असं मला सतत वाटत आलं आहे. अर्थात, हे आपल्याकडून अगदी सहजपणानं व्हायता हवं आणि जीवनाचा खरा अर्थ हाच असत्याचं आपण जाणायला हवं। कन्याकुमारी, तीन समुद्रांच्या उत्तुंग लाटांमध्ये मी चिंब चिंब भिजून जात होतो. पण खरं तर हा अत्युच्च आनंदाचा क्षण मी वयाच्या ५९ व्या नव्हे, तर १९ व्या वर्षीच अनुभवायला हवा होता. असं झालं असतं, तर माझ्या मनानं तो क्षण कितीतरी अधिक काळ जपता असता, त्यानं मता अधिक समृद्ध केलं असतं, फुलवतं असतं. आपण अनेकदा संपत्ती, सत्ता, प्रतिष्ठा, विविध वस्तू यांसारख्या गोष्टींच्या मागं धावताना असं फुलणं विसरून जातो. जीवनात कितीतरी गोष्टींचं चांदणं पसरलेलं असतं, पण त्यात मिजण्यासाठी आपल्याला उसंतच मिळत नाही माझ्यासारख्यांच्या हातून घडलं ते घडलं आता माझी सगळी धडपड आहे, ती आमच्या भावी पिढ्यांचं या चांदण्यात मिजायचं राहून जाऊ नये, म्हणून.