संवादप्रक्रियेत कमीत कमी संवादघटकांचा र्हास होऊन आपल्याला अभिप्रेत असलेला आशय पोचवणे हा श्याम मनोहर यांचा लेखनविशेष. 'खेकसत म्हणणे, आय लव्ह यू' या कादंबरीत क्रिमिनल आणि दयाळ या दोघांतल्या तुंबळ युद्धाची कहाणी आहे. श्याम मनोहरांनी दुसरे तात्या, प्रा.वडनेरे, संतोष, केशव, डॉ. मुरलीधर वगैरे पात्रे तपशिलात रंगवली आहेत. एक म्हातारा आपल्या कल्पनेतून ही पात्रे तयार करतो आणि त्यांच्याविषयी लिहितो. ते टेप करून लिहायचे काम करता करता मोठ्ठा डल्ला मारायची स्वप्ने पाहणारा एक तरुण म्हणजे क्रिमिनल. म्हातार्याच्या कल्पनेतून नकळत तयार झालेले एक पात्र, जे अनेकदा डायरीत बरेच काही लिहिते ते पात्र म्हणजे दयाळ. अशी एक भन्नाट रचना मनोहरांनी या कादंबरीत केली आहे. श्याम मनोहरांचा निवेदक एका विशिष्ट तिरकस शैलीत बोलतो तसेच याही कादंबरीत आहे. ज्ञान, संशोधन, सभ्यता, संस्कृती अशा संकल्पनांचा आणि त्यांच्या आपल्या समाजातील स्थानाचा, उपस्थितीचा खोलवर धांडोळा श्याम मनोहर यांनी या कादंबरीत घेतला आहे.
श्याम मनोहर : (२७ फेबुवारी १९४१). मराठी कथा-कादंबरीकार व नाटककार. पूर्ण नाव श्याम मनोहर आफळे. जन्म भिकार तासगाव (जि. सातारा) येथे. त्यांचे प्राथमिक शिक्षण लिंब, अंगापूर आणि तासगाव येथे झाले. साताऱ्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांनी माध्यमिक शिक्षण घेतले. तसेच सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालय आणि कराडचे सायन्स महाविद्यालय येथे उच्च शिक्षण घेऊन ते बी.एस्सी. झाले (१९६४) आणि पुणे विद्यापीठातून एम्.एस्सी. ही पदवी त्यांनी संपादन केली (१९६७). त्यानंतर अध्यापनक्षेत्रात शिरुन त्यांनी डॉ. दातार कॉलेज, चिपळूण; ज्ञानप्रबोधिनी, पुणे येथे काही काळ अध्यापन केल्यानंतर पुण्याच्या सर परशुरामभाऊ कॉलेजात ते प्राध्यापक म्हणून काम करु लागले आणि त्याच महाविद्यालयातून निवृत्त झाले. माध्यमिक शिक्षण घेत असतानाच ते लेखन करु लागले. 'काँपिटिशन' ही त्यांची पहिली कथा. त्यानंतर कथा, कादंबरी आणि नाटक ह्या तिन्ही साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन केले. आणि बाकीचे सगळे (१९८०) व बिनमौजेच्या गोष्टी (१९८०) हे त्यांचे दोन कथासंग्रह प्रसिद्घ आहेत. त्यांच्या कथांच्या शीर्षकांतही वेगळेपणा दिसून येतो. उदा., 'वासू अमक्यातमक्या ठिकाणी ऐसपैस', 'गुरुत्वापसरणाचे प्रदेश' इत्यादी. हे ईश्वरराव, हे पुरुषोत्तमराव (१९८३), शीतयुद्घ सदानंद (१९८७), कळ (१९९६), खूप लोक आहेत (२००२), उत्सुकतेने मी झोपलो (२००६) या त्यांच्या कादंबऱ्यांतून कादंबरीचे रुढ आकृतिबंध आढळणार नाहीत; तथापि समाजातील वेगवेगळ्या स्तरांतून आलेल्या व्यक्ती, त्यांचे एकमेकांशी येणारे संबंध, परस्परकिया, त्यांतील विसंगती, गुंतागुंत हे सर्व माणसांसंबंधीची आस्था न सोडता ते आपल्या वैशिष्ट्यपूर्ण पद्घतीने व्यक्त करतात. माणसांना त्यांच्या जगण्यातून अनुभवास येणारे नैतिक प्रश्न ते उभे करतात आणि अस्वस्थतेची तीव जाणीव निर्माण करतात. उपरोधप्रचुरता हे त्यांच्या कादंबरीलेखनाचे आणखी एक लक्षणीय वैशिष्ट्य. त्यांचा उपरोध ते अतिशय साध्या पण अपेक्षित परिणाम साधणाऱ्या भाषेतून प्रकट करतात. मध्यमवर्गीयांच्या आत्मकेंद्रित वृत्तीमुळे येणारा जीवनाकडे प्रगल्भपणे पाहण्याचा अभाव हा अनेकदा त्यांच्या उपरोधाचे लक्ष्य ठरतो. शब्दांचा वापरही ते अनेकदा असांकेतिक पद्घतीने करतात. यकृत (१९८६), हृदय (१९८७), येळकोट (१९९३), प्रेमाची गोष्ट ? (१९९७), दर्शन (२००४) ह्या त्यांच्या नाटकांतूनही असांकेतिक लेखनाची वैशिष्ट्ये प्रत्ययास येतात. उत्कृष्ट कथालेखनासाठी कराड पुरस्कार (१९८३); सर्वोत्तम नाट्यलेखनासाठी नाट्यदर्पण पुरस्कार (१९८३, १९८६, १९९४); कादंबरीलेखनासाठी ह. ना. आपटे पुरस्कार (१९८४); गंगाधर गाडगीळ पुरस्कार (१९९४); उत्सुकतेने मी झोपलो या कादंबरीसाठी साहित्य अकादेमी पुरस्कार (२००८) त्यांना प्राप्त झाले आहेत.
Fantastic. Shyam manohar is a keen observer of social events/Social life. He finds the events,compare and contracts between what is promised or happening and what ideally should happen. Some exmples are as follows: 1.Gudhipadwa ha apla varsharambh ase RSS wadi mhantat,pan gudhipadvyala maja yet nahi ,karan to pavitra aahe. mag 31 december la maja karaychi. lokana maja ani pavitrya donahi hawe. (Gudhipadwa is year start for marathi people, but we cant enjoy day,as it is holy day. So we enjoy 31st december. We want both enjoyment and holiness.)
2.Wadh divasala niranjan lavun ovaltat ani cake kapun happy birthday hi gatat. (People on their/other's birthday, pray (ovalne) with Diya but also cut cake and sing happy birthday.
He juxtaposes the things and it makes sense. Those who are keen observer of humanity,society will definitely like his serious tones as they are thought provoking.