गेल्या सात दशकांपेक्षाही अधिक काळ, भारताची कथा ही विकासाची आणि सामाजिक तसंच राजकीय बदलांच्या कथांपैकी एक आहे, जी नेहमीच विसरली जाते. अंकुर, सीमा आणि सुशांत यांनी विस्मरणात गेलेल्या आपल्या स्मृती टवटवीत करत, जिवंत करत या पुस्तकात प्रत्येक वर्षाच्या घटनांना एका विशिष्ट चित्रपट गीताशी जोडलं आहे. अशा देशात जिथे प्रत्येक ऋतूसाठी, प्रत्येक भावनेसाठी एक गाणं असतं, तिथे चित्रपटगीत राष्ट्रासाठी रूपक बनतं. हिंदी चित्रपट गीतं देशाच्या अस्मितेला आणि मनःस्थितीला प्रतिबिंबित करतात, तसंच ती आपल्या काळातील भावभावनांवर छाप सोडल्याशिवाय राहत नाहीत. ‘अफसाना लिख रही हूं’मध्ये देश त्याची कथा स्पष्टपणे मांडत होता, अशा परिस्थितीत नियतीला सामोरं जाण्याच्या प्रयत्नांना नेहरूंनी &#