स्त्री-वादी पुस्तकांमध्ये एक 'bold' पुस्तक. स्त्रियांच्या आणि एकूणच मानव जातीच्या लैंगिक हक्कांबद्दल बोलतं हे पुस्तक. एका सत्य कहाणीला मराठी कादंबरीचं रूपडं देताना अंजली जोशी यांनी मूळ गाभ्याला धक्का न देता वाचकांना गुंतून ठेवण्याची कला बरोबर साधली आहे. कुठेही बीभत्स वाटत नाही हे या पुस्तकाचं आणखी एक यश..