Jump to ratings and reviews
Rate this book

गंधाली

Rate this book
This is a collection of stories based on famous historical figures. The name indicates that this is a set of stories having it`s own fragrance. In the beginning the author admits that ‘Words have no fragrance. They have only meanings. But a combination of many words present a person and the atmosphere May be after reading these stories reader will feel the fragrance too then it will give me immense satisfaction.` The author shows his confidence and faith in the readers. All the stories in ‘Gandhali` are based on the lives of famous personalities and the incidences from the past. He has slected each one carefully. Each story is a homogenous mixture of valour, compassion and romance. Each one reflects the author`s command over language and takes the reader to the history itself. The success of ‘Gandhali` is intense on the background of novels from the same author, based on historical figures.

159 pages, Kindle Edition

Published January 1, 1971

128 people are currently reading
396 people want to read

About the author

Ranjit Desai

19 books54 followers

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
254 (45%)
4 stars
169 (30%)
3 stars
101 (18%)
2 stars
20 (3%)
1 star
17 (3%)
Displaying 1 - 18 of 18 reviews
Profile Image for Nikhil Pimputkar.
6 reviews6 followers
October 19, 2014
This is the only book authored by Ranjit Desai that I've read. From whatever I know of him, he has mastery in writing novels which are based on famous historical personalities. (e.g राधेय, श्रीमान योगी, स्वामी इ.)
'Gandhali' is a collection of five stories based on different historical figures lived in different eras. The common theme of the five stories is love, followed by separation. (which is the inevitable end to every love story in the world)
The author succeeds in taking us back to those (medieval/pre-British) eras. The sad incidents are more intense than the happy, romantic incidents. By what I know of the author, he could have put a little more weight on romance between the two leading characters in each story.
I didn't like the second story in the book as I didn't understand what exactly the author wanted to say and the weak story line.
Profile Image for Omkar.
4 reviews17 followers
May 9, 2017
गंधाली..
पुस्तकाला दिलेलं हे नाव अगदीच सार्थ ठरत. प्रत्येक कथेला एक वेगळा, स्वतःचा असा खास अन ऐतिहासिक गंध आहे, जो कथा वाचून पूर्ण झाल्यावरदेखील मनात तसाच रेंगाळत राहतो. मग ते सलीमच नूर साठी तीळ तीळ तुटणं असो अथवा कलानिपुण माहेलकाचे बुद्धीचातुर्य असो, प्रत्येक कथा मनाला मोहून ठेवते.
रणजीत देसाई यांचे भाषेवरचे प्रभुत्व, प्रेमाचे वेगवेगळे ऋतू दाखवणाऱ्या अन मनावर ऐतिहासिक ठसा उमटवणाऱ्या दर्जेदार कथा 'गंधाली' ला गंध प्राप्त करून देतात.
प्रत्येक प्रेमचातकाने एकदातरी वाचावं असं पुस्तक..
13 reviews
October 23, 2018
अप्रतिम लेखन...

उलघडणारी प्रत्येक कथा वाचकाला काही ना काही देऊन जाते.. प्रत्येक कथे सोबत एक नवा प्रवास सुरु होतो आणि एका सुंदर भावनांच्या बागेत फिरवून शेवटी आपल्याला अंतर्मुख करत हा प्रवास संपतो...
एकदा तरी वाचावच असं...
Profile Image for Gangaprasad Koturwar.
29 reviews21 followers
January 21, 2021
There is a certain element of divinity that flows when Ranjit Desai pens down a story. This is a very light read comprising of five independent stories mostly depicting romance. The last story can be thought to be a continuation of Shreeman Yogi.
2,142 reviews27 followers
April 13, 2022
This collection is an attempt by author to write about well known tragic legends of love in medieval onwards India, including one of Noorjehaan; another, seemingly - from title - of Mastaanie, but actually, set in much later times.

Tale of Mastaanie does come in this collection, but only later - the arrangement of contents usnt chronological - and more to the point, here Mastaanie is introduced as someone brought by younger brother of Bajirao for refuge with the elder brother, who's impressed with her art and beauty but nevertheless is in no hurry to give himself or his heart.

This is in direct contradiction of the recent depictions based on another, relatively recent novel on the topic, which showed her a daughter of Chhatrasaal by a muslim wife, and one who considered herself a wife of Bajirao due to a tradition he was unaware of, leaving her his knife and thus making her wife as per tradition of her home region.


विराणी

"“बेटा! असला हट्ट धरु नकोस. तुझ्यावर माझी मोहोबत आहे. पण त्याहीपेक्षा तख्ताला मी अधिक बांधला गेलोय. ते प्रेम एवढं जबरदस्त आहे की, प्रसंग आलाच तर तख्ताची इज्जत राखण्यासाठी तुझ्यासारख्या आवडत्या मुलाचाही त्याग करायला मी क्षणभरही मागंपुढं पाहणार नाही. तो प्रसंग तू माझ्यावर आणू नकोस. माझं मन शांत होईपर्यंत माझ्यासमोर येऊ नकोस!”"

"“शेर अफगाण, बादशहांचा आपणांस खास निरोप आहे.”

"“सांगा ना! खाविंदांची आज्ञा शिसावंद्य आहे.” शेर अफगाण म्हणाला.

"“सांगेन! पण त्या आधी आपल्या सेवकांना आज्ञा द्यावी.”

"शेर अफगाणने सेवकांना आज्ञा दिली. महालात दोघेच उरले. कुतुबुद्दिन विचारात गढला होता. स्वत:ला सावरीत तो म्हणाला,

"“शेर अफगाण! तुम्ही हे शांतपणे ऐकावं अशी माझी विनंती आहे. जहांपनाह जहांगीर बादशहांची अशी इच्छा आहे की, तुम्ही आपल्या बेगम मेहरुन्निसा यांच्याशी तलाक घ्यावा. खाविंदांची इच्छा आहे की, बेगमना मलिका - ए - आलम बनवावं. आपण ही गोष्ट मान्य केलीत तर, बंगालची सुभेदारी मिळवून देण्याची जबाबदारी...”

"“खामोष!” संतापाने उठत शेर अफगाण म्हणाला. सर्रकन् त्याची तलवार म्यानाबाहेर आली. कुतुबद्दिनही ताडकन् उठला.

"“शेर अफगाण, तलवार म्यान करा. मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं. संतापाच्या आहारी जाऊन आज्ञेचा उपमर्द होईल तर, तुमच्यासकट बरद्वान बेचिराख केलं जाईल.”

"संताप आवरीत शेर अफगाण म्हणाला, “तुम्ही आता जा. ह्या आज्ञेचं उत्तर मी उद्या देईन.”"

"नूरजहान जशी राजकारणात हिरिरीने भाग घेऊ लागली, तसे नकळत जहांगीरने राजकारणातून लक्ष काढून घेतले. नूरजहानची सत्ता सर्वांना माहीत झाली. तिच्या हुकुमाला सरदार तत्पर असत. न्यायदानापासून ते मोहिमांच्या बंदोबस्तापर्यंत, सारे नूरजहान पाही. जहांगीर मदिरा आणि नशा यांमध्ये मग्न होता. एके दिवशी नूरजहानने हट्टाने जहांगीरला किल्ल्याबाहेर काढले. किल्ल्याच्या दक्षिणेला एक टुमदार इमारत बांधली होती. ती इमारत जहांगीर प्रथमच पाहात होता. तो नूरजहानसह त्या इमारतीत गेला तेव्हा, तेथे सुवास दरवळत होता.

"“काय आहे?” जहांगीरने आश्र्चर्याने विचारले.

"“अत्तरखाना!” नूरजहान म्हणाली, “आपल्या देशात अत्तर बनविण्यासाठी मी दूरदूरचे जाणकार आणले आहेत. गुलाबाचं अत्तर इथं तयार होतं.”

"पुढे केलेल्या अत्तराचा सुवास बादशहाने घेतला आणि तो म्हणाला. “उगीच तुझ्या हाती राज्य दिलं नाही नूर! फुलापासून अत्तर बनविणारे तुम्ही कुठं अन् नाना सुंदर फळांपासून मदिरा बनविणारे आम्ही कुठं! रसिकता केवढ्या भिन्न मार्गांनी प्रगट होऊ शकते, नाही?”"

"नूरजहानला ते ऐकणे अशक्य झाले. तिला अश्रू आवरेनात. शेर अफगाण... ज्याने हक्काने तिला मिळवलं... ज्याने तिच्या मनाचे फाजील लाड कधीही पुरविले नाहीत... ज्याचा हक्क अखेरपर्यंत तिला जाणवत राहिला होता, त्याला नूरजहान सर्वस्व देऊन मोकळी झाली होती... आनंदाने त्याची गुलाम बनली होती, आणि हा सलीम! तिच्यावर प्रेम करण्यापलीकडे उभ्या आयुषयात त्याने काही केले नव्हते. एवढासाही मोह न धरता तिच्या पायाशी ताज आणि तख्त त्याने अगदी सहजपणे ठेवले होते. त्या निषठावंत प्रेमाच्या बदली, ती मात्र काही देऊ शकली नव्हती. राज्याचा न्यायनिवाडा करण्यात निष्णात असा जिचा लौकिक तीच नूरजहान, ज्याने तिच्या हाती विश्वासाने न्याय दिला त्या जहांगीरला न्याय देऊ शकली नव्हती... तिचा पराजय मोठा होता."


असा रंगला विडा

"राजनर्तकी माहेलका रावरंभांच्या पदरी राहिल्याची वार्ता भागानगरात पसरायला वेळ लागला नाही. माहेलकाच्या सहवासात रावरंभा रमले. माहेलका रावरंभांच्या पदरी होती तरी, निजाम अलीखानच्या दरबारातील तिची चाकरी चालूच होती. अनेक वेळा राजवाड्यात तिच्या नृत्यगायनाच्या मैफली होत.

"त्या वेळी पुण्यात सवाई माधवराव पेशवे होते. निजामशाही आणि पेशवाई यांच्यातला वैमनस्याचा अंगार दोघांच्याही मनात धुमसत होता. दोघांचे वैर केव्हा पेटेल याचा भरवसा नव्हता. आणि याच वेळी पुण्यात सवाई माधवरावांचा विवाह निश्चित करण्यात आला. पुण्यामध्ये मोठी तयारी सुरु झाली. लगनाची आमंत्राणे साऱ्या राजांना, सरदारांना, मानकाऱ्यांना पाठविली गेली. पेशव्यांच्या लगनाचे निमंत्राण मोठ्या थाटात भागानगरच्या दरबारी सरंजामासह आले. उद्याच्या शत्रूच्या घरचे आमंत्राण पाहून साऱ्यांना आश्चर्य वाटले. खास मसलत भरली. विचारविनिमय सुरु झाला. बैठकीत निजाम, वजीर, सरदार अश्रफुल उमरा, राजे रावरंभा निंबाळकर ही विश्वासू सल्लागार मंडळी होती. ... "

"पुणे वैभव कळसाला पोचले होते. निजामपुत्र पोलादजंग लगनाला येणार हे कळताच, पेशवेदरबार आश्चर्यचकित झाला. निजामपुत्र येत असल्याची बातमी आली, तसेच खुद्द छत्रपती महाराजांचेही आगमन निश्चित झाले. पुण्याभोवती नजर टाकावी तिकडे पाहुण्यांसाठी निरनिराळे तळ उभारले होते. एकएक पाहुणे पुण्यात येऊ लागले. दक्षिणप्रांतीच्या संस्थानिकांसह टिपू सुलतान पुण्यात येऊन दाखल झाला. सारे मराठे आणि ब्राह्मण सरदार— जतिक्यांना बोलावणी पोचली तितके, सरंजामसुद्धा पुण्यात दाखल झाले. तमाम फौजा आपापल्या मिसळीने तळावर उतरत होत्या. राजेरजवाडे, संस्थानिक, परराज्यातील वकील, त्यांची नाना तऱ्हेची निशाणे निरनिराळ्या तळांवर फडकू लागली.

"फर्जंद पोलादजंग नगरवेशीवर येत असल्याची बातमी पुण्याला आली. नाना फडणीस स्वागताला आधीच गेले होते. खुद्द पेशवे निजामपुत्रच्या स्वागतास गेले. पुण्यातील रस्त्याने मेण्यातून जात असता, माहेलका पुण्याचे दर्शन घेत होती. गुढ्यातोरणांनी सजलेल्या रस्त्यांवरुन मेणा असफजाही तळावर गेला. शाही डेऱ्यांनी, भव्य शामियान्यांनी सजलेला तो भव्य तळ पाहून माहेलका चकति झाली. वर्दीस्वार, खिजमतगारांपासून सारी व्यवस्था चोख होती.

"रावरंभा निंबाळकर फर्जंदांच्या तैनातीस गुंतले असताना, माहेलका पुणे पाहात होती. मोठ्या धामधुमीत आणि ऐश्वर्यसंपन्न वातावरणात श्रीमंतांचा विवाहसोहळा पार पडला. श्रीमंतांची वरात पाहून साऱ्या पाहुण्यांना पेशवाईच्या श्रीमंतीची खात्री पटली. त्या रात्री दारुकामाची लक्ष नक्षात्रो आकाशात चमकली. लगनसोहळा पार पडला आणि एके दिवशी श्रीमंतांचे निजामपुत्रांना जाफतीचे आमंत्रण आले. रावरंभा निंबाळकर निजामपुत्रासह मेजवानीला गेले. पंधराशे खासा निजामपुत्र नबाब पोलादजंगबरोबर मेजवानीला हजर राहिला. खास या मेजवानीसाठी श्रीमंतांनी पंधराशे रुप्याची ताटे करविली होती. बिछायतीवर सफेद चादरी पसरुन त्यावर पंक्ती मांडल्या होत्या. उदबत्त्यांच्या सुगंधात मेजवानीचा बेत पार पडला. आणि कोवळ्या वयाच्या श्रीमंतांसह नबाब बहादुर नाचीच्या महालाकडे चालू लागले. नबाबाच्या सन्मानार्थ खास गाण्याची बैठक आयोजित करण्यात आली होती.

"काळ्याभोर सुरुदार खांबांनी सुशोभति असलेल्या नाचीच्या महालाची बैठक, रुजाम्याच्या गालिचांनी शृंगारली होती. चिरागदानांच्या उजेडात भरजरी खासी बैठक उजळून निघाली होती. सुवर्ण गुर्र्झब हाती घेतलेल्या भालदारांनी अदब बजावली. मुजऱ्यांचा स्वीकार करीत श्रीमंत सवाई माधवरावांची स्वारी खाशा पाहुण्यांसह बैठकीवर विराजमान झाली. श्रीमंतांच्या उजव्या हाताला नाना फडणीस होते. नबाबांच्या डाव्या हाताला रावरंभा निंबाळकर, अश्रफुल उमरा बसले होते. नाना फडणिसांनी इशारतीची नाजुक टाळी वाजविली. पेशवे दरबारची खास कलांवतीण व्यंकट नरसी दरबारी प्रवेश करती झाली. साजिंद्यांनी आपल्या वाद्यांसह गायिकेच्या मागे जागा घेतली. मुजरा करुन व्यंकट नरसी गाऊ लागली. सारा महाल त्या सुरेल आवाजाने भरुन गेला. माना डोलू लागल्या. फर्जंद पोलादजंग तल्लीन होऊन गाणे ऐकत होते. उत्तर रात्री गाणे संपले. तृप्ततेचा नि:श्वास बाहेर पडला."

"संधी मिळताच नाना आपले जरी उपरणे सावरीत म्हणाले,

"“इतकं चागलं गाणं आपल्या दरबारी आहे याचा श्रीमंतांना आनंद आहे. श्रीमंत कधीकाळी भागानगराला यायचा योग आला तर, जरुर आपल्या दरबारचं गाणं ऐकतील.”

"नाना फडणिसांच्या बोलण्यातील खोच चटकन रावरंभा निंबाळकरांच्या लक्षत आली. ते हसून म्हणाले,

"“त्यासाठी भागानगरापर्यंत यायची श्रीमंतांना तकलीफ कशाला? श्रीमंतांची आज्ञा होईल तर, ते गाणं इथंही ऐकायला मिळेल.”

"“इथं?” नाना उद्गारले.

"“हो! त्यात काय कठीण?”"

"रात्री नाचीच्या महालात पेशवेदरबारचे आणि निजामदरबारचे खास मानकरी हजर झाले होते. साक्षात् गंधर्वकन्या असा लौकिक असलेल्या व्यंकट नरसीवर तोड करु पाहाणे म्हणजे फजीत होणे असा पेशवे दरबारच्या मानकऱ्यांचा कयास होता. मैफल केव्हा सुरु होते आणि निजाम-दरबारचा नक्षा कसा उतरला जातो हे पाहाण्याला सारे उतावीळ होते. प्रत्येक मानकरी आपले खास कपडे करुन मैफलीत आला होता. पगड्यांना मोत्यांच्या झुरमुळ्या होत्या. कानांत रत्नांचे चौकडे होते. गळ्यात कंठे शोभत होते. अनेक अत्तरांचा मिश्र सुगंध वातावरण धुंद करीत होता.

"खाशा स्वाऱ्या महालात आल्या. सारे स्थानापन्न झाल्यानंतर नबाबांनी विचारले,

“पंडति पंतप्रधान, मैफलीची आज्ञा करायची ना?”

"सवाई माधवरावांनी मान झुकवली. रावरंभा निंबाळकरांनी टाळी वाजवताच नाचमहालाच्या उजव्या दरवाज्याचा चिकाचा पडदा दूर केला गेला. नऊ तरुण स्त्रियांनी आत प्रवेश केलेला पाहाताच सारे चकति झाले. मुजरा करुन कलावंतिणीसाठी घातलेल्या बैठकीमागे त्या स्त्रियांनी चंद्राकार जागा घेतली आणि वाद्ये जुळू लागली. वाद्ये जुळवून होताच, निंबाळकरांनी परत टाळी वाजविली. कुतूहल शिगेला पोचले होते. महालात शांतता पसरली. नूपुरांचा क्षीण आवाज स्पष्ट होत दाराशी आला.

"माहेलकाने आपल्या जागेवर येऊन आपले अवगुंठन मागे टाकले; आणि मोठ्या आदबीने श्रीमंत आणि नबाबबहादुरांना मुजरा केला. माहेलकाच्या दर्शनाने सारे श्वास अवरोधले गेले. तिच्या असामान्य लावण्याने साऱ्यांचे नेत्रा दिपले होते. कोणी तरी न राहवून बोलून गेले, “साक्षात् वसंतसेना!”

"हळू आवाजात काढलेला तो उद्गारदेखील साऱ्यांना स्पष्टपणे ऐकू गेला. माहेलका आपल्या मादक नेत्रांनी पाहात होती. ती सुरुच्या झाडासारखी सडपातळ होती. सोनचाफ्याने लाजावे अशी तिची अंगकांती होती. धारदार नाक, पातळ रेखीव गुलाबी ओठ आणि नाजूक खांद्यावर चढलेली उंच मान तिच्या सौंदर्यात भर घालीत होती. तिच्या कपाळी हिऱ्यांची बिंदी रुळत होती. कानात माणकाच्या मासोळ्या चमकत होत्या. गळ्याशी लपेटलेला लप्फा नजरही ठरु देत नव्हता. गळ्यात बोराएवढ्या मोत्यांचे दोन लांबझोक लग रुळत होते. नाजूक बोटांत अंगठ्या आणि पंजावर सुवर्णरत्नखचति पल्लव शोभत होते. कमलदलासारख्या नाजूक तळहातांवर मेहंदीची सुबक नक्षी चतिारली होती.

"नाना फडणीस विस्फारति नेत्रांनी ते लावण्य पाहात होते. मोगली पेहरावातील माहेलकाने पुन्हा आदब केला आणि तिने डावा हात कानावर ठेवून आकार लावला. त्या निर्मळ सुराबरोबर साऱ्या मैफलीतून दाद उठली. माहेलका गात होती

"— “ऊधो, मन न भये दस-बीस....”

"माहेलकाच्या गाण्यापुढे व्यंकट नरसी कैक योजने मागे पडल्याची जाणीव सर्वांना झाली. सारे कसब पणाला लावून माहेलका विश्वासाने गात होती."

" ... माहेलकाच्या गळ्यातील मोत्यांचे सर तिच्या गुडघ्यापर्यंत रुळत होते. माहेलकाने मुजरा करुन नृत्याला सुरुवात केली. मृदंगाचे बोल पायांतून निघू लागले. वाद्यांनी लेहरा धरला. त्या सुरावर माहेलका नेत्रा, हस्तभाव दर्शवीत होती. लय वाढत होती. सारे खिळल्या नेत्रांनी ते नृत्य पाहात होते आणि वाढत्या लयीवर फेर घेत असताना अचानक हस्तक्षोपाने माहेलकाच्या गळ्यातील एक सर तट्कन तुटला. बोराएवढे मोती खालच्या बैठकीवर घरंगळले. बैठकीभोवती बसलेल्या अनेक जणांचे लक्ष त्या मोत्यांवर खिळले. अनेक जणांचे हात नकळत मोती वेचू लागले. चोपदारही ते मोती गोळा करीत होते— आणि क्षणात नृत्य थांबले. माहेलकाचा आवाज आला,

"“खामोश! ते मोती वेचू नका!”

"वेचलेल्या मोत्यांचे हात पुढे केले गेले. माहेलका म्हणाली,

"“टाका ते मोती!”

"...आणि वेचलेले ते मोती परत बैठकीवर घरंगळले. बोराएवढे मोता टाका! मग त्या मोत्यांचे करायचे काय?

"माहेलकाच्या चेहऱ्यावर हसू उमटले. ते संयमाने आवरीत ती म्हणाली,

"“बेअदबीची माफी असावी हुजूर! आमच्या दरबारी नेहमी असे मोता तुटतात, पण ते आम्ही वेचीत नाही. सकाळी महाल साफ करायला जे सेवक येतात त्यांना ते मिळतात.”

"त्या उद्गारांनी माहेलकाने पेशवे दरबारचे उरलेसुरले ऐश्वर्य लुटले होते."

"माहेलकाच्या सन्मानार्र्थ खास दरबार भरविण्यात आला. पेशवे दरबारीचे आणि निजाम दरबारीचे खासे दरबारात हजर होते. सवाई माधवराव, फर्जंद पोलादजंग दरबारी आले. पेशवे मसनदीवर बसले. उजव्या बाजूला खास न��जामपुत्रासाठी केलेल्या बैठकीवर निजामपुत्र स्थानापन्न झाले. कोवळ्या वयाचे श्रीमंत वीरासन घालून मसनदीवर बसले होते. मस्तकी फेटा तमामी, अंगात निमा व पायांत विजार होती. श्रीमंतांच्या मस्तकी शिरपेच, कलगी व मोत्यांचा तुरा होता. गळ्यात मौल्यवान कंठा होता. छातीपर्यंत आलेल्या त्या कंठ्यात हिरे व पाचू एकाआड एक गुंफले होते. श्रीमंतांची नजर कोवळी होती, तरी त्यात विश्वास दिसत होता. श्रीमंतांजवळ नाना फडणीस उभे होते. नबाब पोलादजंगामागे रावरंभा व अश्रफुल उमरा हात बांधून उभे होते. श्रीमंतांच्या शेजारी चंदनी तिवईवर नक्षीदार सुवर्ण खासदान ठेवले होते. श्रीमंतांच्या डाव्या बाजूला रेशमी आच्छादने घातलेली तबके ओळीने ठेवली होती.

"माहेलका दरबारी आली. तिने श्रीमंतांना व नबाबांना लवून कुर्नीसात केला. नानांनी इशारत दिली आणि तबकांची आच्छादने काढली गेली. नाना म्हणाले,

"“माहेलकाबाई, — तुम्ही श्रीमंतांच्या मैफिलीत नृत्य-गायन सादर केलंत. श्रीमंत आपल्या नैपुण्यावर प्रसन्न आहेत. तुमच्या कलेची कदर करावी म्हणून एक लक्ष रुपये बिदागी अन मानाचं वस्त्र श्रीमंतांनी देऊ केलं आहे. त्याचा स्वीकार करावा.”

"माहेलकाने रावरंभांकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर स्मति होते. माहेलकाची नजर श्रीमंतांवर स्थिर झाली. ती म्हणाली, “हुजूर! तुमच्या कृपेची मला धन्यता वाटते. बेअदबी होणार नसेल तर, हुजूरचरणी एक अर्ज आहे.”

"“काय? सांगा! आमची आज्ञा आहे?”

"“मला संपत्तीचा लोभ नाही हुजूर! त्याची मला कधीच कमतरता पडली नाही. माझ्या अन्नदात्यांच्या कृपेनं, माझ्या घरी संपत्ती पाणी भरते. त्यामुळे आपल्या लक्ष रुपयांचं मला मोल नाही. आणि ज्याचं कौतुक वाटत नाही ते आपल्या दरबारी स्वीकारुन, आपण दर्शविलेल्या कृपेचा अपमान करावा असं वाटत नाही. स्वीकारणं जिवावर येतं.”"

"“बाई तुम्हांला काय म्हणायचं ते आम्ही जाणतो! माहेलका तुला जे मागायचं असेल ते तू मागू शकतेस. माग.”

"बालवयाचे पेशवे बोलून गेले. पण नानांच्या अंगावर काटा उभा राहिला. सारे मुत्सद्दी भयचकित झाले. ही हुशार बाई काय मागते याची भीती साऱ्यांना वाटत होती. साऱ्या दरबारचे श्वास अवरोधले गेले.

"“खुदा खैर करे!” माहेलकाची मान क्षणभर लवली आणि ती म्हणाली, “आपल्या औदार्याला तोड नाही हे या जगात एक खुदा आणि उदार राजाच जाणू शकतो, हुजूर! नाचीची एकच इच्छा अधुरी राहिलेली आहे.”

"“सांगा!” पेशवे म्हणाले.

"“आमच्या भागानगरला सर्व ऐश्वर्र्य आहे.” माहेलका अविचलति शब्दांनी म्हणाली, “मी आपल्या दरबारी आले तेव्हा माझं लक्ष आपल्या उजव्या बाजूला ठेवलेल्या खासदानाकडे गेलं. आमच्याकडे असे सुरेख गोविंदविडे बांधले जात नाहीत. दासीला द्यायचं झालंच तर तो विडा द्यावा. बस्स! माझी दुसरी कोणती इच्छा नाही. तो मिळाला तर सारं मिळाल्याचं समाधान मला लाभेल.”"

" ... श्रीमंतांनी खासदानातील विडा उचलला आणि विडा देण्यासाठी हात पुढे केला. माहेलका पुढे झाली. पेशव्यांच्या कोवळ्या मनगटावर पाचूची पोहची चमकत होती. विडा देण्यासाठी हात खोळंबला होत. माहेलका श्रीमंतांना म्हणाली,

"“हुजूर! आपण विडा देत आहात, याचा अर्र्थ आपणांस माहीत आहे ना? तो आपण जाणत असलात तरच विडा सोडावा.”

"हात थांबला. श्वास घुटमळले. नानांनी विचारले, “कसला अर्र्थ?”

"माहेलकाच्या ओठांच्या कोपऱ्यावर हसू होते. डोळ्यांत वेगळीच चमक दिसत होती. माहेलकाचे शब्द स्पष्टपणे उमटले—

"“विडा हे प्रेमाचं प्रतीक! मी भागानगरची राजनर्तकी... म्हणजे त्या दरबारची प्रतिनिधी. माझे अन्नदाता अली अला हजरत निजाम उल्मुल्क आणि श्रीमत पंडति पंतप्रधान पेशवेसाहेब यांच्या मनात परस्परांबद्दल जिव्हाळा, प्रेम राहणार असेल तरच या विड्याला अर्र्थ आहे. मनात वैरभाव असेल तर अजूनही विडा मागं घेतला जावा.”

"दरबार थक्क झाला होता. निजामस्वारीचा बेत साऱ्यांना माहीत होता. नानांनी स्वारीची सारी तयारी पुरी करीत आणली होती. नानांना काही सुचत नव्हते. श्रीमंत लहान असले तरी, राजकारणाच्या आखाड्यातच ते वाढले होते. चेहऱ्यावरची रेषा न बदलता ते म्हणाले,

"“माहेलका! आम्ही तुझ्यावर खूष आहो! ज्या दरबारी धन्याचे भले चिंतणारे तुमच्यासारखे थोर कलावंत असतात त्यांना धक्का कोण लावील? जोवर तुमच्या दरबाराकडून आमची आगळीक होत नाही, तोवर आम्ही आपणहून चाल करणार नाही. स्नेह टिकवण्याचा जरुर प्रयत्न करु. हात पुढं कर.”

"माहेलकाचे नेत्रा आनंदाने भरुन आले. तिने रावरंभांकडे पाहिले. सद्गदति झालेल्या रावरंभांनी आपला हात आपल्या मस्तकीच्या शिरपेचाकडे नेला. माहेलकाच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. ती का हसली हे कुणालाच कळले नाही. ... "


अशी छेडली तार


"बंदेअलींनी मेहेंदळ्यांची जी तारीफ ऐकली होती ती अतिशयोक्ती नव्हती. बापूसाहेब मेहेंदळे, अप्पाशास्त्री वैद्य आणि बाळशास्त्री माटे हे त्या काळचे पुण्यातील प्रख्यात वैद्य. बाळशास्त्री शास्त्रज्ञ होते. अप्पाशास्त्री औषधे बनविण्यात तज्ज्ञ होते. त्यामुळे त्यांना सिद्धरसायनी म्हणतात. पण मेहेंदळ्यांचा लौकिक धन्वंतरी म्हणून होता. सकाळी सूर्योदयानंतर त्यांचा दरवाजा उघडे. माध्यान्हीपर्यंत ते रोगी तपाशीत. स्वत:ला बसायला एक घोंगडी व समोर रोग्यासाठी एक घोंगडी यांखेरीज दुसरा सरंजाम नसे."

"बंदेअली चुन्नासह पुण्यातल्या कसब्यात घर घेऊन राहिले. बापूसाहेब मेहेंदळ्यांचे औषध सुरू झाले. चुन्नाला आराम पडू लागला. बंदेअली शेख सल्ल्याच्या दर्ग्यात सायंकाळी सेवेला जाऊ लागले. मेहेंदळ्यांच्या हाताला खरेच यश दिसू लागले. तीन महिन्यांत चुन्ना बरी झाली. एके दिवशी बंदेअलींना मेहेंदळ्यांनी चुन्ना बरी झाल्याचे सांगितले. बंदेअलींचा आनंद मनात राहीना. त्यांनी चटकन मेहेंदळ्यांचे पाय धरले.

"“अरे, हे काय करतोस? कलावंतानं एवढं विनम्र होऊ नये!” बापूसाहेब म्हणाले, “पाय धरलेस म्हणून बिदागीत छदाम कमी होणार नाही.”

"“अर्ज आहे...” हात जोडून बंदेअली म्हणाले, “छदाम कमी न करता बिदागी वाढवता येईल तेवढी वाढवावी!”

"“असं म्हणतोस?” मेहेंदळे विचारात पडले. “त्याचाच विचार करतोय.” बंदेअली बिदागीचा आकडा ऐकण्यास आतुर होते. काही क्षण तसेच गेले.बापूसाहेबांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. ते म्हणाले,

"“बंदेअली, वैद्यसुद्धा रसिक असतो. किंबहुना वैद्याइतका रसिक कोणीच नसतो. सांगितलं तर आश्चर्य वाटेल, आम्हीसुद्धा कछवा, सतार छेडतो. करमणुकीसाठी आमचा मोकळा वेळ आम्हांला सांगता येत नाही. आम्ही जेव्हा तुम्हांला निरोप पाठवू तेव्हा, तुम्ही आमच्याकडं यायचं आणि आम्हाला मनसोक्त बीन ऐकवायचं. आमच्या परवानगीखेरीज पुणे सोडायचं नाही. हीच माझी बिदागी... आहे कबूल?”"

"पुण्याच्या शनिवारवाड्यापासून नव्या पुलावर जात असताना, पुलाच्या पहिल्या कमानीपाशी थोडे थांबा. तिथे थांबून, डाव्या हाताला नजर टाकलीत तर, नदीकाठी उभा असलेला शेख सल्ल्याचा पांढरा-शुभ्र दर्गा दिसेल. तिथेच वटवृक्षाजवळ वाढलेला एक उंच लिंबारा उभा आहे. त्या लिंबाच्या बुंध्यालगत एक छोटी कबर आहे. त्या कबरीवर गेल्या आत्म्याची नावनिशाणीही कोरली आहे. लिंबाला जेव्हा बहर येतो, तेव्हा ही कबर त्या नाजूक फुलांनी आच्छादली जाते. शेख-सल्ल्यातून उठणारा उदबत्ती-धूपाचा सुगंध त्या कबरीभोवती घोटाळतो. पौर्णिमेच्या रात्री कधी एकटे त्या ठिकाणी गेलात तर, आजही बीनचे सूर तुम्हांला ऐकू येतील... भाग्यवान असलात तर."
*****


अशी रंगली प्रीत


"मस्तानीने मोठ्या कौतुकाने मुलाला बाजीरावांच्या मांडीवर दिले. बाजीराव आपल्या मुलाला निरखीत होते. मुलाला परत पाळण्यात ठेवीत असता त्यांचे लक्ष पाळण्यावर टांगलेल्या तलवारीकडे गेले. बाजीरावांनी विचारले.

"“पाळण्यावर ही तलवार का लावली?”

"मस्तानी हसली. म्हणाली,

"“पाळण्यावर शस्त्र लावलं की बाधा होत नाही म्हणे.”

"पाळण्यातल्या मुलावर नजर रोखीत बाजीराव बोलून गेले.

"“बाधा? आणि आमच्या चिरंजीवांना? नाही मस्तानी, ते अशक्य आहे. बाळापणापा��ून ह्याच्या नजरेसमोर समशेर ठेवली तर हा समशेरबहाद्दर होईल.”

"“कुणास माहीत, त्याच्या नशिबी काय आहे ते!”

"“ते भविषय वर्तवण्यास ज्योतिषयाची गरज नाही. जसे आमचे नाना, रघुनाथ, जनार्दन, तसेच हे चौथे.”"

" ... काशीबाई नेहमी आजारीच असत. या बातम्यांनी त्यांची चिंता वाढली. एके दिवशी त्यांनी हा विषय बाजीरावांकडे काढला—

"“आम्ही ऐकतो ते खरं का?”

"“कशाबद्दल?”

"“कोथरूडच्या महालाबद्दल.”

"बाजीरावांनी नि:श्वास सोडला. ते म्हणाले,

"“खरं आहे. साऱ्या पुण्याला ते माहीत आहे.”

"काशीबाई त्या उत्तराने निराश झाल्या. त्यांनी कष्टाने विचारले, “आपल्यासमोर कोणी काही बोलत नाहीत. पण माघारी...”

"“माघारी काय बोलतात याचा विचार आम्ही केला नाही. करणार नाही. आमच्या माघारी आमच्याबद्दल हवं ते छत्रपतींच्या कानावर घालण्यातही त्यांनी कमी केलं नाही.”

"“मग?” भीतीयुक्त नजरेने काशीबाईनी विचारले.

"बाजीरावांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. आपल्या संजाबावरुन हात फिरवीत ते म्हणाले,

"“छत्रपती हलक्या कानाचे नव्हेत. कान भरु पाहणाऱ्यांनाच त्यांनी कानपिचक्या देऊन परत पाठविलं. त्यांनी सांगतिलं— उत्तरेच्या सनदा आणून, छत्रपतींच्या राज्याचं साम्राज्य करण्याचा पराक्रम कोणीही करावा आणि पदरी ....
Profile Image for Gautam Soman.
55 reviews8 followers
November 4, 2016
"स्वामी"कार रणजित देसाई यांचा हा ऐतिहासिक कथा-संग्रह. या "विराणी", "असा रंगला विडा", "अशी छेडिली तार", "अशी रंगली प्रीत" व "नक्षत्रकथा" या पाच कथा आहेत. पैकी, "विराणी" (सलीम-नूरजहान) व "अशी रंगली प्रीत"(बाजीराव-मस्तानी) या निखळ प्रेमकथा असून इतर कथांनाही प्रेमभावनेची तरल किनार आहे.
त्या-त्या ऐतिहासिक काळात चपखल बसणारी शब्दरचना, केवळ शब्दांनी व्यक्तीचित्र साकार करण्याची हातोटी व भावपूर्ण प्रसंग यामूळे वाचकाला आपण त्या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदारच आहोत असे वाटत राहते. टिपून ठेवावेत असे संवाद तर पानो-पानी आहेत.
ऐतिहासिक कथांची आवड असणाया वाचकांसाठी हे पुस्तक म्हणजे पंचपक्वान्नांची मेजवानीच आहे.
Profile Image for BHAKTI GUPTE.
51 reviews1 follower
December 2, 2020
Gandhali is a collection of 5 stories by Ranjit Desai spanning over the Mughal and Maratha era which will keep it's fragrance lingering in your mind. The author is truly a literary magician.

The stories revolve around 1. Mehrunnissa and Jehangir, 2. Mahelka, 3. Chunna and Bandeali, 4. Mastani and Bajirao, 5. Sambhajiraje

Read the complete review on my blog by clicking on the following link

https://mintiblog.wordpress.com/2020/...
Profile Image for Prashant Mane.
27 reviews1 follower
July 5, 2019
Historical Love stories with best writing style

There are 5 different stories in the book. All stories are good in their own way. They have different fragrance as the name suggests. The book keeps you occupied in the stories.
Profile Image for Swapnil Bankar.
2 reviews
September 3, 2018
Book has 4 stories which is about the love in indian history. According to author love has no age, no religion. and Indian history gives the example of this.
This entire review has been hidden because of spoilers.
9 reviews
Read
May 10, 2020
विभिन्न काळातील वेगवेगळी ऐतिहासिक स्त्री पात्रे उलघडणाऱ्या कथा ....
12 reviews1 follower
June 1, 2021
ऐतिहासिक सत्यासत्यता थोड्यावेळासाठी बाजुला ठेवल्यास काही उच्च दर्जाच्या कथा वाचायला मिळतात.
Profile Image for Sujay Sawant.
102 reviews1 follower
March 14, 2023
स्त्री पुरुष नात्यातले आदर, मोह, अधिकार, कर्तबगारी आणि एकमेकांसाठी समर्पण असे विविध पैलू सांगणाऱ्या गाथा, इतिहास काळातील शब्द, पेहेराव आणि नगरांचे शृंगारिक वर्णन आणि संवाद मनाचा वेध घेतात.
25 reviews
August 23, 2024
Very well written. I was not able to keep it down after I started reading the same. Some of the stories I was not aware at all .
Profile Image for Rohit Harip.
55 reviews6 followers
February 8, 2015
मराठी भाषेच्या सौंदर्यासाठी चांगले पुस्तक।।।
2 reviews
May 13, 2019
Good Book to read

I like this book . Good collection of stories . Writing is impressive . Stories are heart touching . .
Displaying 1 - 18 of 18 reviews

Can't find what you're looking for?

Get help and learn more about the design.