बुद्धिबळांतला राजा खरा असतो का? परीकथेतल्या पया खया असतात का? नाटकातली पात्रं खरी असतात का? प्रश्न साधे, उत्तरे सहज समजणारी. आणि तरी ती समजून घ्यायला नाना प्रकारच्या अनुभवांतून जावे लागते. वलयात गुरफटलेल्या कितीतरी माणसांची ओळख व्हावी लागते. शहाणी नि मूर्ख, व्यवहारी नि स्वप्नवेडी माणसं. अशा माणसांच्या कथांचा हा संग्रह वाचकाच्या मनाला स्पर्शून गेल्याशिवाय राहणार नाही.
Vasant Purushottam Kale, popularly known as Va Pu, was Marathi writer who wrote short stories, novels, and biographical sketches.He authored more than 60 books. His well-known books include Partner, Vapurza, Hi Waat Ekatichi, and Thikri.
वलय हा वपुंचा आणखीन एक कथासंग्रह. पुस्तकातील सर्व कथां मध्ये एक साम्य आहे आणि ते म्हणजे प्रेम , ममता. वपुंच्या कथा काल्पनिक पण म्हणता येत नाहीत कारण नेहमीच त्या वास्तवाला धरून असतात आणि ह्यात पण त्यांनी तेच केले आहे. पुस्तकात कुठेच राजा राणी किंवा घोड्यावरून आलेला राजकुमार अजिबातच दिसणार नाही. पण प्रेमाच्या विविध छटा नक्की दिसतील ज्या आपण आपल्या खऱ्या आयुष्यात पण अनुभवतो. त्याग, ओढ, भक्ती, विश्वासघात, सुंदरता आणि दुःख ह्या सर्व भावनांची आलेली लाट म्हणजेच वलय आहे. अनोळखी , ओळखीची, रक्ताची, दूरची अश्या सर्व नात्यांना वपुंनी ह्या पुस्तकात छान उतरवले आहे.