‘या अगरबत्त्यांचा समर्थांनी माझ्या पाहण्यात बराच वेळा उपयोग केलेला आहे. त्याच्या धुरावाटे काही विविक्षित रासायनिक पदार्थ माणसाच्या शरीरात शिरून मेंदूवर परिणाम करतात. मध्यंतरी समर्थांनी मला त्यांच्या कार्याविषयी काही सांगितलं होतं. मेंदूतील काही भाग बाहेरच्या माहितीचा आढावा घेऊन, स्वत:च्या सर्व शक्तींशी त्यांची सांगड घालून मग शरीराच्या इंद्रियांची प्रतिक्रिया ठरवितात. त्यांच्या कार्यक्षमतेची पातळी या रसायनांनी खाली येते. त्यांनी त्यांना रेडिओतील वेगवेगळ्या सर्किटस्ची उपमा दिली होती. त्यापैकी काही शॉर्ट केल्यावर जशी निरुपयोगी होतात तसंच इथे होतं. ‘हां. मी समर्थांच्यासारखंच बोलायला लागलो. त्या रसायनांच्या कार्याशी आपल्याला आता कर्तव्य नाही.
Narayan Gopal Dharap ( August 27 , 1925 - August 18 , 2008 ; Pune , Maharashtra ) was a Marathi language writer, dramatist. It is mainly known for horror stories and mystery stories. The fictional character "Samarth" created by him and the mystery stories based on him became particularly popular.