‘‘श्री कृष्णा महाराजांनी स्वत:ची चिंता रचून अग्निसमाधी घेतली. त्याआधी त्यांनी 501 वा ‘कळसाचा अभंग’ लिहिला आणि नोंद केली ‘माझं जीवकार्य संपलं... देवानं मला बोलावलं....’ आणि ते निघून गेले. आजच्या वर्तमानात अविश्वसनीय ठरावी अशी ही घटना आहे. एक पंचविशीतला तरुण जमतेम दहावी शिकलेला, कोणत्याही मानवी गुरू न लाभलेला, अभंग लिहितो आणि त्यातून जीवनतत्त्वज्ञान सांगतो, ही नवलाईची गोष्ट आहे. कृष्णाचे अभंग मराठी संतपरंपरेचा प्रवाह विस्तारित करणारे आहेत. खरं बोलणं आणि वागणं म्हणजे ईश्वराकडं जाणं. लोभ, अहंकार, राग या शत्रूंपासून दूर राहा. गरिबांना लुबाडणार्या ढोेंगी बुवा-साधूंपासून सावध व्हा. कर्मकंडात अडकू नका. रम हीच ईश्वरसेवा समजा, हे त्यांच्या अभंगाचं सूत्र आहे.