कनिक हे धृतराष्ट्राचे प्रमुख मंत्री होते. ते एक हुशार आणि विद्वान राजकारणीही होते.
महाभारताच्या संभव पर्वात धृतराष्ट्र आणि महामंत्री कनिक यांच्यात झालेला एक संवाद येतो. त्या संवादात महामंत्री कनिक धृतराष्ट्राला राजकारणाची बरीच उच्च तत्त्वे शिकवतात.
महामंत्री कनिक यांचा हा उपदेश 'कनिकनीती' किंवा 'कनिकगीता' या नावाने प्रसिद्ध आहेत. तीच अमर तत्त्वे या पुस्तकात सादर केली गेली आहेत.