मालवणी भाषा म्हणजे वाचकाच्या जिभेवर गोड रसाळपणा निर्माण करणारी मराठीची लाडकी बोली. या भाषेतील कथा-कविता यांना एक वेगळीच मजेशीर आणि आपुलकीची झाक असते. अश्या मातृभाषेतील आपलेपणा जपणारे आणि मुंबई मध्ये राहूनही आपली कोकणी मुळे न विसरणारे लेखक ‘प्रभाकर भोगले’ यांचा ‘इरसाल गजाली’ हा मालवणी बोलीतील कथासंग्रह. या कथासंग्रहास सन - २००५ साली, को. म.सा.प. संस्थेतर्फे दिला जाणारा ‘विशेष पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. मालवणातील ‘गणपती उत्सव’ म्हणजे कोकणी लोकांचा ‘जीव की प्राण’, या उत्सवातील गमती जमतींपासून सुरु होणार हा संग्रह अवघ्या ६ कथांमधून वाचकाला आपलेसे करतो. कधी तो लग्नसमारंभाचे वर्णन करून वाचकांना भावनिक करतो, तर कधी “बाबल्या” आणि आचार्य अत्र्यांची गोष्ट सांगून