हे पुस्तक म्हणजे वडिलांच्या आठवणींचा त्यांच्याच मुलीने लिहिलेला एक प्रवास आहे.वडील म्हणून ती व्यक्ती कशी होती, तिचं आपल्या कुटुंबाबरोबरच नातं कसं होतं हे या प्रवासातून हळूहळू उलगडत जातं.या आठवणींमध्ये मुलीची आई, भावंडं, नातेवाईक, मित्र मैत्रिणी , प्राणी , पशुपक्षी , साहित्य, संगीत , वेगवेगळे अनुभव , ठिकाणं यांचीही उकल होत जाते.एकूणच हा प्रवास वाचकाला समृद्ध करुन जातो.