एका स्त्रीच्या दृष्टिकोनातून अनुभवाला येणारं सभोवतालचं जग, त्यामधले व्यवहार आणि भावनेच्या कसोटीवर अभावितपणे होणारी त्याची मोजमापं या कथांमध्ये उतरतात.
कन्या, बहीण, मावशी, आत्या, काकू, आजी अशा नात्यांमध्ये स्त्रीचं अस्तित्व केवढं तरी समृद्ध आहे. आणि सर्वात श्रेष्ठ नातं आईचं! वात्सल्य, माया, ममता आणि शब्दांमध्ये न मावणारं गहिरेपण या नात्यात आहे.
या कथांमधून सकारात्मकतेचा सूर आहे. मानवधर्म न सोडण्याचा इरादा आहे. 'माणूसकी' हा सर्वात महत्त्वपूर्ण गुणधर्म माणसाने जपला पाहिजे. निर्भेळ आनंदाचे काही क्षण जीवनप्रणालीत असायलाच हवेत. 'वेळ' अमूल्य आहेच; परंतु त्यापेक्षाही माणसाचं 'असणं' खूप महत्त्वाचं आहे. हे सर्व अधोरेखित करणाऱ्या या सर्व कथा आहेत...