गोष्ट सुरु होईल तेव्हा सुरु झाला पाहिजे.....
गोष्ट वाचून होईस्तोवर पडला पाहिजे....
गोष्टीतल्या पात्रांमध्ये रमला पाहिजे...
नायिकेमागे धावताना दमला पाहिजे...
दोघांमधल्या रागासारखा
लटका लटका भांडला पाहिजे...
नंतर तिच्या डोळ्यांमधून
सर सर सांडला पाहिजे...
सुखदु:खाच्या होडीतून असे दूरवर तरंगताना...
मध्येच भान यावे आणि पहावे तर पाऊस !
'हा कधी आला?' म्हणावे हसून...
मागे रेलून...डोळे मिटून....
मग आठवावी आपली एखादी गोष्ट-
- तर तिथेही...पाऊस !...
-संदीप खरे
Published on December 22, 2012 22:26